सिंधुदुर्ग किल्ला
- नाव - सिंधुदुर्ग,
- उंची - 200 फुट,
- प्रकार - जलदुर्ग,
- ठिकाण - सिंधुदुर्ग , महाराष्ट्र.
- डोंगररांग - सिंधुदुर्ग,
- स्थापना - नोव्हेंबर २५, इ.स. १६६४.
सिंधुदुर्ग किल्ल्याला एवढे महत्व का होते ? सिंधुदुर्ग किल्ला कोठे आहे? तो कोणी बांधला?सिंधुदुर्ग किल्ल्याला एवढे महत्व का होते ? त्याचा इतिहास काय? अशा अनेक अनेक प्रश्न आपल्याला पडतात. सुरुवातीला जाणून घेऊया किल्ला कुठे आहे कोणी बांधला.
महाराष्ट्राच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांपैकी सिंधुदुर्ग हा एक शक्तिशाली किल्ला आहे. 25 नोव्हेंबर 1664 मध्ये किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. हिरोजी इंदुलकर यांनी या किल्ल्याचे बांधकाम केले.21 जून 2010 मध्ये भारत सरकारने या किल्ल्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले.
सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व :-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात फार महत्व होते. सिंधुदुर्ग किल्ला कुरटे बेटावर 48 एकरात विस्तारलेला आहे. किल्ल्याच्या तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटरच्या आसपास आहे. किल्ल्याच्या बुरुजांची संख्या 52 व तेथे 45 दगडी जिने आहेत .किल्ल्यावर शिवकालीन गोड्या पाण्याची दगडी विहीर आहे. त्या विहिरीचे नाव दुध विहीर, दही विहीर, साखर विहीर अशी ठेवण्यात आले आहेत. या किल्ल्यावर ती शिवाजी महाराजांनी त्याकाळी 35 ते 40 शौचालयाची निर्मिती केली आहे ,या किल्ल्यावरती महाराजांचे शंकराच्या रुपातील एक मंदिर आहे .हे मंदिर शिवपुत्र राजाराम महाराज त्यांनी बांधले आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास :-
स्वराज्याच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवणीतील सिंधुदुर्ग किल्ला होय. छत्रपती शिवाजी महाराजांकडे 362 या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, पश्चिमेस अरबी समुद्र व दक्षिणेस हुबळी आणि उत्तरेस खानदेश वऱ्हाड या पर्यंत विस्तार होता. डोंगरी किल्ले आणि भुईकोट बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूचे आक्रमण परतून लावण्यासाठी जलदुर्गांची निर्मिती करण्यात आली. समुद्रकिनार्याची पाहणी करून 1664 मध्ये मालवण जवळील कुरटे नावाच्या बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते किल्ल्याच्या तटांची पायाभरणी झाली. आज ही जागा मोरयाचा दगड म्हणून प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेश मुर्ती, एकीकडे सूर्या कृती व दुसरीकडे चंद्राकृती कोरुंन महाराजांनी पूजा केली.
असं म्हणतात की या किल्ल्याच्या बांधणीसाठी एक कोटी होन एवढा खर्च झाला. या किल्ल्याच्या बांधणीसाठी तीन वर्षाचा कालावधी लागला. ज्या कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आले. नैसर्गिक व ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला हा किल्ला ज्या कुरटे खडकावर उभा आहे, तो शुद्ध काळा भिन्न खडक मालवणपासून तुम्हारे अर्धा मैल समुद्रात आहे. या किल्ल्याचा तट 2 मैल इतका आहे. त्या तटाची उंची 30 फुट व रुंदी 12 फुट आहे. किल्ल्यास 22 बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहेत पश्चिमेस अथांग सागर पसरला आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे :-
गडाचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून तटा जवळ गेले की दिसते. या खिंडीतून आत गेले की दुर्गाचा दरवाजा लागतो. हा दरवाजा उंबराच्या फळ्यापासून तयार केला आहे. आत गेल्यानंतर मारुतीचे छोटेखानी मंदिर आहे. मंदिरापासून बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावरून जवळपास 10 मैलांचा प्रदेश दिसतो.पश्चिमेस जरिमरीचे देऊळ आहे. आजही लोक तेथे राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची बैठी प्रतिमा दिसते. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावर दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी येते. जेव्हा इंग्रजांनी हा किल्ला जिंकला तेव्हा किल्ला उद्ध्वस्त करून टाकला. किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज ठाणे ध्वजस्तंभ 288 काय फूट उंच होता. समुद्रातून दूरपर्यंत हा ध्वज सहज दिसत होता.हा भगवा ध्वज इ.स.१८१२पर्यंत फडकत होता.
गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत.बंदुका रोखण्यासाठी तटाला भोके ठेवली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी महाराजांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जाते, असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने महाराजांनी किल्ला उभा केला. तो आजही असा थाटात होतो आहे.
किल्ल्यावरील पिण्याच्या पाण्याची सोय :-
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात तीन गोड्या पाण्याच्या विहीरी आहेत. त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत.ह्या विहिरींचे पाणी चवीला अत्यंत गोड आहे. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत मध्ये गोडे पाणी आहे.पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला होता.सध्या त्यातील पाण्याचा वापर भाजीपाला पिकवण्यासाठी होतो.
सिंधुदुर्ग किल्ल्याचे व किल्ल्यावरील फोटो :-