किल्ला म्हणजे काय? किल्ल्यांचे प्रकार किती? महाराष्ट्रात असे किती किल्ले आहेत? त्यांची संख्या किती? या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व काय? असे अनेक प्रश्न उद्भवतात. यासाठी पहिल्यांदा जाणून घेऊया किल्ला म्हणजे नेमके काय? व किल्ल्यांचे प्रकार.
महाराष्ट्र मधील किल्ले हे तेथील भौगोलिक रचनेच्या अनुसार बांधण्यात आले आहेत, महाराष्ट्रातील पश्चिम दिशेला सह्याद्री पर्वतरांग आहे, याच परिसरात महाराष्ट्रातील सर्वात जास्त किल्ले पहायला मिळतात , हे किल्ले डोंगरावरती बांधण्यात आले आहेत. यामागे अनेक उद्देश होते कोणता किल्ला कोणत्या कारणास्तव बांधला हे सांगता येत नाही. तसेच काही किल्ले पठारी भागात सुद्धा आहेत व काही किल्ले हे समुद्रामध्ये बांधण्यात आले आहे .समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवताय यावी व संरक्षण करता यावे यासाठी समुद्री किल्ले बांधण्यात आले.
महाराष्ट्रातील "किल्ल्यांचे प्रकार" हे कोणत्या जागेवर वा कोणत्या ठिकाणी बांधण्यात आले आहे त्याच्यानुसार त्याचे प्रकार पडतात. किल्ल्याचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात." गिरिदुर्ग " म्हणजेच डोंगरी किल्ला, जलदुर्गा म्हणजेच समुद्रामध्ये बेटावर बांधण्यात आलेल्या किल्ला आणि भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ला म्हणजेच सपाट भूभागावर बांधण्यात आलेला किल्ला, याव्यतिरिक्त किल्ल्याचे काही प्रकार आहेत." वनदुर्ग " म्हणजे जंगलात असलेला किल्ला, गव्हरं दुर्ग म्हणजे गुहा त्याचा वापर किल्ल्या सारखा होतो.
महाराष्ट्रातील डोंगरी किल्ले
.
शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी सुलभ जावे आणि सभोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे, म्हणून डोंगरा मध्ये बांधलेल्या वास्तूला डोंगरी किल्ले असे संबोधले जाते.छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले त्यामध्ये तोरणा, रायगड, राजगड, प्रतापगड, यासारखे अतिशय सुंदर व प्रसिद्ध किल्ले महाराष्ट्रात आहेत.......... more>>
महाराष्ट्रातील जलदुर्ग/सागरी किल्ले
समुद्र किल्ला अर्थात जलदुर्ग (त्याच्या अभिजात स्वरूपात) समुद्र किनारा पासून दूर असलेले आणि चारी बाजूंनी पाण्याने वेढलेला एक किल्ला होय. हे एक तटबंदीचे बेट किंवा एखाद्या बेटावर , केलेले विस्तृत किवा डोंगरी बांधकाम होय.........
महाराष्ट्रातील भुईकोट किल्ले
भुईकोट म्हणजे भूमीवर बांधलेला कोट. अर्थात, जमिनीवर बांधलेला किल्ला. मराठ्यांच्या आणि पेशवाईच्या काळात अनेक भुईकोटअस्तित्वातआले.भुईकोट किल्ल्याचा छोटा प्रकार......... more>>
महाराष्ट्रातील वनदुर्ग
भारतातील बहुतेक किल्ले प्रत्यक्षात अरण्य वा जंगली भागात आहेत. जे किल्ले अश्या भागात आहेत अथवा ज्या किल्ल्या वर वने वा अरण्ये आहेत , अश्या किल्ल्यांना वन दुर्ग असे संबोधले जाते . शक्यतो हे किल्ले लढाई च्या ......... more>>