तोरणा किल्ला
- नाव -तोरणा किल्ला/प्रचंडगड,
- उंची -४६०४ फूट,
- स्थापना -१४७० ते १४८६,
- ठिकाण -वेल्हे तालुका, पुणे जिल्हा, महाराष्ट्र,भारत
- डोंगररांग - सह्याद्री
- प्रकार -गिरिदुर्ग.
तोरणा किल्ला हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे. तोरणा किल्ला नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. 1400मीटर उंचीचा तोरणा किल्ला हा गिरीदुर्ग प्रकारातील आहे. सुरुवातीच्या काळात शिवाजी महाराजांनी जे किल्ले जिंकले त्यापैकी एक किल्ला तोरणा . गडाचे नाव हे तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले आहे. महाराजांनी जेव्हा गडाची पाहणी केली तेव्हा त्याच्या प्रचंड विस्तारामुळे तोरणा किल्ल्याचे नाव बदलून "प्रचंडगड" असे ठेवले.
पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या रांगेत हा किल्ला आहे. हा एक अतिशय सुंदर किल्ला आहे.किल्ल्याच्या दक्षिणेला वेळवंडी नदी आहे .गडाच्या पश्चिमेला कानद खिंड तसेच उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे व पूर्वेला खरे खिंडी आहेत. पुण्यापासून हा किल्ला 60 किलोमीटर आहे.
तोरणा किल्ल्याचा इतिहास :
श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इसवी सन 1647 मध्ये पहिलाच किल्ला घेतला हा किल्ला घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव "तोरणा किल्ला "असे ठेवण्यात आले.
शिवाजी महाराजांना या किल्ल्यावर काही प्रमाणात धन सापडले त्याचा उपयोग राजगडाच्या बांधण्यासाठी केला.हा किल्ला कोणी बांधला याचा पुरावा उपलब्ध नाही किल्ल्यावरील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन हा शेव पंथांचा आश्रम असावा . इसवी सन 1470 ते 14 86 च्या दरम्यान बहामनी राजवटी साठी मलिक अहमद त्याने हा किल्ला जिंकला पुढे जाऊन हा किल्ला निजामशाहीत गेला .कालांतराने शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला व त्याचे नाव प्रचंडगड असे ठेवण्यात आले. गडावर काही इमारती बांधल्या. आग्र्यावरून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यामध्ये तोरणा या किल्ल्यावर महाराजांनी 5 हजार होन खर्च केला.
संभाजी महाराजांची निर्गुण हत्या झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. त्यानंतर शंकराजी नारायण सचिवांनी हा किल्ला पुन्हा जिंकून मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे जाऊन इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून त्याने तो जिंकला त्याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय असे ठेवले . परंतु परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे किल्ल्यावरती चढाई करून पुन्हा गड मराठ्यांच्या ताब्यात आणला वयानंतर हा कायम स्वराज्याचाच राहिला. शिवाजी महाराजांनी केलेल्या पुरंदरच्या तहात मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांच्या कडेच राहिला होता. त्यामध्ये विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला हा मराठ्यांचा किल्ला होय .
- तोरणा गडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे.
- तोरणा गडावर तोरण जाई देवीचे मंदिर आहे.
- तोरणा गड दोन माची आहेत ,त्यामध्ये बुधला माची व झुंजार माची.
- गडावर एक ध्वज स्तंभ सुद्धा आहे.
तोरणा गडावर जाण्यासाठी मार्ग :
पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे गाव तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. पुणे ते वेल्हे अंतर हे 60 किलोमीटर आहे.
- नसरापुर ते वेल्हे, पुणे ते पानशेत ते वेल्हे, पुणे ते खानापूर ते पाबे मार्गे वेल्हे अशा मार्गाने तोरणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते.
- महाराजांच्या काळातील वेल्हे ते वेर्गे पाऊलवाटेने दोन तास बिनी दरवाजातून तोरणा किल्ल्यावर जाता येते. हा मार्ग इतर मार्गापेक्षा अतिशय सोपा आहे.
- दुसरा मार्ग वेल्हे गावापासून 5 किलोमीटर आंतर असलेल्या भट्टी या गावातून जातो. गावाच्या पश्चिमेकडून वाळण जाई दरवाजातून बुधला माचीवर जातो.